Posts

शंभुराजे कृत बुधभूषण मधील निवडक श्लोक

राजाची सामान्य कर्तव्ये व्यसनानि च सर्वाणि भूपति: परिवर्जयेत् । सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया: ॥ अर्थ:  राजाने सात दोष टाळले पाहिजेत,हे दोष पुढीलप्रमाणे आहेत वाग्दण्ड  -राजाने कठोर बोलणे टाळावे पारूष्य  - इतरांचा अपमान करणे टाळावे दुरयातंच -संरक्षणाशिवाय राजाने दुर जाऊ नये पान -मद्यपानापासून दूर असावे स्त्री -राजांस स्त्रीचे व्यसन नसावे मृगया -गरीब प्राण्याची शिकार करू नये द्युत -जुगारापासून राजाने दुर राहावे काले मृदुर्यो भवति काले भवति दारूण: । राजा लोकद्वयापेक्षी तस्य लोकद्वंय भवेत ॥ अर्थ:  राजामध्ये मवाळ व कठोर अशा दोन्ही वृती असाव्यात.वेळ आल्यावर राजाने कधी कठोर तर कधी मवाळ बनावे भृत्यै:  सह महीपाल: परिहासं च वर्जयेत् । भृत्या:  परिभवन्तीह नृपे हर्षवशंगतम्  ॥ अर्थ:  राजाने नोकराबरोबर थट्टा मस्करी करू नये.नोकरांच्या वेढ्यातील राजा हर्षवश होऊन नंतर तिरस्कृत होतो. छत्रपती शहाजीराजे यांचे सुबक भृशबदान्वयसिन्धू सुधाकर: प्रथितकीर्तिरूदारपराक्रम:| अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव: ||...

छत्रपती शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण व आजचे भारतीय कृषी धोरण,एक विरोधाभास !!!

स्वराज्याचा कणा शेतकरी आहे , हे  छत्रपती शिवरायां ना माहित होते , त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना त्या काळात राबविल्या . शेतकऱ्यांना सारा ( कर ) भरण्यात सवलत देणे , शेतकऱ्यांना व्याजरहित कर्ज देणे तसेच आपल्या सैनिकांपासून शेतकऱ्यांना त्रास होऊ न देण्याची जबाबदारी महाराजांनी घेतली होती . याबाबत महाराजांनी प्रभानवल्ली ( तालूका .  संगमेश्वर ,  जिल्हा . संगमेश्वर ) येथील सुभेदाराला लिहिलेले इ . स . १६७६  सालातील एक पत्र फारच महत्वपुर्ण आहे . रामाजी अनंत सुभेदाराला महाराज फर्मावितात , “ चोरी न करवी , इमाने - इतबारे साहेब काम करावे , येसी तू क्रियाच केलीच आहेस . त्येणेप्रमाणे येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास ( रास्त ) व दुरूस ( दुरूस्त ) वर्तणे . या उपरि कमाविस कारभारास लावणी संचणी उगवणी जेसी जेसी जे जे वेलेस जे करू ये ते ते करीत जाणे . हर भातेने  ( तऱ्हेने ) साहेबाचा वतु  ( उत्पन्न ) अधिक होये ते करीत जाणे . मुलकात बटाईचा तह ( अधेलीचा करार ) चालत आहे ; परंतु रयेतीवर जाल ( जुलूम )  न पडता रयेतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आप...

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी

माझा मराठीची बोलू कौतुके।  परि अमृतातेहि पैजासी जिंके।  ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे.तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे.  लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात एक ऐकतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी   कविश्रेष्ठ कुसूमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी  सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे नऊ कोटी लोकांची मातृभाषा आहे.अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या ग्रंथात,शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो.सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात(अंदाजे इ.स.पू.२२०-इ.स.२१८)मराठी भाषेची साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.सतरावा सातवाहन राजा हाल याचे "गाथासप्तशती" हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे. देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला.याच कालखंडात मुकुंदराज...

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १२ जून १६४९ चाकण प्रांत व संग्रामदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल झाला. १२ जून १७३२ सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली १२ जून १८९६ इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगड ला भेट दिली.  ➖

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष ११ जून १६७४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्सेंटनला भेटण्याची परवानगी दिली. हेन्री ऑक्सेंटन राज्याभिषेका पूर्वी रायगडावर दाखल झालेला होता. व्यापारासंबंधी तहावर सह्या करण्यास तो आतुरला होता. आणी राज्याभिषेकाआधीच करार ठरावा असे टुमणे निराजी मार्फत त्याने लावले होते. पण महाराजांनी त्याची दाखल अजिबात घेतली नाही राज्याभिषेकानंतर ही ४ दिवस राजांनी त्यांना ताटकळत ठेवले.

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

आजचे ऐतिहासिक दिनविशेष १० जून १६६४ विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १६७६ छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात. राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १६८१ औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जुन १६८३ फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले. 🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩 १० जून १७६८ पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

९ जुन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे ऐतिहासिक दिनविशेष ९ जुन १६८० दक्षिणेचा सुभेदार नेमलेला खान खानजहान बहाद्दूर औरंगाबादला पोहचला व त्याने लगेच मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या हनुवंतगडास ( अहिवंतगड ) वेढा घातला. ९ जून १६९६ छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले. ९ जून १७०० दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला. ९ जुन १७०० परळी किल्ला मोगलांना प्राप्त. २ महिने निकराचा संग्राम होऊन बादशहाचे पुष्कळ लोक जाया झाले. इकडे गडावर राजाराम मरण पावल्याची खबर आली तेव्हा गडावर ‘परशुराम त्रिंबक’ कारभार पाहत होते. राजारामाच्या मृत्यूची वार्ता ऐकून परळीच्या किल्लेदारास न विचारता परशुराम त्रिंबकने बादशहास शरणचिट्ठी लिहिली त्यामुळे धान्यसामग्री संपल्यामुळे आजच्या दिवशी ९ जुन रोजी परळीचा किल्ला मोगलांना प्राप्त झाला. ९ जून १७१८ पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दि...